दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रात दिल्या तशा ‘बटेंगे तो कटेंगे’सारख्या घोषणा दिल्या नाहीत. केजरीवालांच्या हातातून दिल्ली घेण्यासाठी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत भाजपने सगळा भर दिला तो रेवड्यांवर. त्यातही करमुक्तीची रेवडी दिल्लीतल्या मध्यमवर्गीय मतदारासाठी सगळ्यात आकर्षक ठरली.
दिल्लीत आम आदमी पक्ष हरला याचा भाजपला आनंद होणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण, केजरीवालांची सत्ता गेल्यामुळे काँग्रेसही सुखावलेला आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन कट्टर राष्ट्रीय पक्षांना आपण जिंकलो असे एकाचवेळी वाटावे असा दुर्मीळ योग केजरीवालांनी घडवून आणला आहे! केजरीवालांनी एक तपाच्या राजकीय आयुष्यात अनेक किमया केल्या, त्यातील ही एक मानायला हरकत नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दुसरा निष्कर्ष असा की, भाजपने तात्पुरत्या उभ्या केलेल्या ‘ब चमू’ला स्वत:च गारद केले. २०१२ मध्ये काँग्रेसविरोधातून केजरीवाल राजकीयदृष्ट्या मोठे झाले. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला भाजप व संघाने बळ दिले होते. या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून केजरीवालांनी काँग्रेसच्या शीला दीक्षित यांच्या दिल्लीतील सरकारविरोधात रणशिंग फुंकले आणि सत्ता मिळवली. ‘आप’च्या दिल्लीतील सत्तेने भाजपसाठी बफर म्हणून काम केले. आता या ‘बफर’ची भाजपला गरज उरलेली नव्हती. केजरीवालांचा पराभव करणे भाजपसाठी आवश्यक बनले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपने ‘आप’ व केजरीवालांना धूळ चारली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा