दिल्लीतले संमेलन संपताच सारे राजकारणी शरदरावांनी बंगल्यावर आयोजित केलेल्या मेजवानीसाठी जमले. सुप्रियाताई जातीने सर्वांचे स्वागत करायला हजर होत्याच. तेवढ्यात एक सहायक धावत येऊन साहेबांच्या कानात कुजबुजला तशी त्यांची मुद्रा त्रासिक झाली. ‘त्या महामंडळवाल्यांना व लेखकांना स्पष्टपणे सांगा की तुमच्यासाठीची मेजवानी पुण्यात आयोजित करू, येथे का बोलावले नाही म्हणून नाराज होऊ नका.’ मग गुलाबी थंडीत जसजशी रात्र चढू लागली तसा मेजवानीला बहर येऊ लागला. सुशीलकुमार म्हणाले ‘संमेलन एकदम झकास झाले. खूपच गर्दी जमली. शरदरावांनी लक्ष घातल्यामुळेच हे होऊ शकले. गेल्या वर्षी त्या अंमळनेरला फारच पचका झाला होता.’ हे ऐकून एकदम उत्साहात येत आशीष व उदय म्हणाले, ‘आपण सारे भेद विसरून एकत्र आलो की यश मिळणारच. आता पुढेही हीच एकी कायम ठेवायची व संमेलनांना ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यायची.’ त्यावर पवारांना अगदी खेटून बसलेले एकनाथराव म्हणाले. ‘सगळे चांगले झाले पण हे साहित्यिक फारच लुडबुड करतात हो. एकाने तर माझे नाव असूनही व्यासपीठावर चढू का देत नाही म्हणून खूप वाद घातला. अखेर बखोटे धरून त्याला बाहेर काढले. शेवटी सुरक्षा महत्त्वाचीच ना!’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा