भ्रष्टाचार कुठल्याही स्वरूपातला असो, तो वाईटच. त्याचे समर्थन होऊ शकत नाही. तो उघड करण्याचे वा खणून काढण्याचे अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत, त्याचा आधार घेत विविध तपासयंत्रणा त्यांचे काम करत असतात अशी आजवरची समजूत. त्याला तडा जातो की काय अशी शंका अलीकडे वारंवार व्यक्त होते. ती रोखण्यासाठी या यंत्रणांचे वर्तन राजकारणनिरपेक्ष असायला हवे. पण तसे होते का? केंद्र सरकारच्या अधीनस्थ काम करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी झारखंडमधील एका मंत्र्याच्या सहाय्यकाकडील नोकराच्या घरी छापे टाकून ३० कोटींची रोकड जप्त केली. या कारवाईची चित्रफीत दहाव्या मिनिटाला माध्यमांमध्ये प्रसारित व्हायला लागली. त्यानंतर अवघ्या काही तासांच्या अंतराने झालेल्या प्रचार सभांमधून मोदी व शहा यांनी या प्रसारणाचा उल्लेख करून विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा