देशातील स्थलांतरितांना कुठूनही मतदान करता यावे या उद्देशाने दूरस्थ मतदान यंत्राचा (रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) पर्याय निवडणूक आयोगाने सादर केला आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ९० कोटींपेक्षा अधिक मतदारांची नोंदणी झाली होती आणि यापैकी ६० कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. म्हणजे सुमारे ३० कोटी मतदारांनी मतदानात भाग घेतला नव्हता. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे व देशातील कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर नागरिक मतदानाचा हक्क का बजावत नाहीत याचा शोध घेण्याचा निवडणूक आयोगाने प्रयत्न केला असता त्यात नागरिकांचे मोठय़ा प्रमाणावर होणारे स्थलांतर हा घटक जबाबदार असल्याच्या निष्कर्षांप्रत आयोग आला. त्यातच मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यावर राजीव कुमार उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यात गिर्यारोहणाकरिता गेले असता एका गावात स्थलांतरामुळे मतदानावर कसा परिणाम झाला होता याचा अनुभव त्यांनी स्वत:च कसा घेतला, हेही आता सांगण्यात येते. त्यातूनच दूरस्थ मतदान यंत्राचा पर्याय निवडणूक आयोगाने मांडला. या यंत्रांचे सादरीकरण करण्याआधी निवडणूक आयोगाने सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह बैठक आयोजित केली होती. ही बैठक गाजली निराळय़ाच- पण मूलभूत कारणामुळे. ‘३० कोटी स्थलांतरितांना लाभ’ असा दावा आयोगाने करताच, ही आकडेवारी आली कुठून, असा आक्षेप भाजपवगळता सर्वच राजकीय पक्षांनी मांडला. शेवटी या यंत्रांचे सादरीकरण करण्याचे आयोगाला लांबणीवर टाकावे लागले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा