स्त्रियांवरील अत्याचार, विनयभंग ही प्रकरणे गंभीरच. पण या आरोपांनंतर जी राजकीय राळ उडवली जाते, त्यातून स्त्रीसन्मान आणि स्त्रियांचे हक्क यांचे गांभीर्य टिकते का, हा प्रश्न आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र रेवण्णा आणि नातू खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप ताजे असतानाच पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांच्या विरोधात राजभवनातील एका महिला कर्मचाऱ्याने विनयभंगाची तक्रार पोलिसात दाखल केली असून त्याबद्दलही आता निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खडाष्टके सुरू झाली आहेत. बढतीसाठी आपल्याला दालनात बोलावून दोनदा गैरवर्तन केल्याची महिला कर्मचाऱ्याची राज्यपालांच्या विरोधात तक्रार आहे. पण राज्यपाल बोस यांनी सारे आरोप फेटाळून लावताना ‘राज्यातील दहशतवाद आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पावले उचलल्याने आपल्या विरोधात मोहीम सुरू झाली’ असा दावा करून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर खापर फोडले आहे. मूळचे केरळचे असलेले हे आनंद बोस भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी. अशी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल होणे हा गंभीरच प्रकार.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा