सत्तेची पायरी अहंकाराला आणखी वरचढ जागा करून देते आणि सत्तेत नसलेले किंवा सत्तेतून पायउतार झालेले या पायरीवरून सत्ताधीशांना स्वाभाविकपणे खुजे दिसू लागतात. सत्तेत येणाऱ्या कोणाच्याही बाबतीत हा नियम चुकलेला नाही. आंध्र प्रदेशात झालेले सत्तांतर हेही या नियमाला अपवाद ठरलेले नाही. निमित्त आहे ते या राज्यातील चार दूरचित्रवाणी वाहिन्या अनेक भागांत दूरचित्रवाणीवरून गायब झाल्याचे. प्रादेशिक भाषेतील या वाहिन्यांचे दूरचित्रवाणीवरून गायब होणे हे सरळसरळ सत्तांतराशी संबंधित असल्याचा आरोप नुकताच सत्तेतून पायउतार झालेल्या वायएसआर काँग्रेस पक्षाने केला आहे. या पक्षाचे राज्यसभा सदस्य एस. निरंजन रेड्डी यांनी याबाबत दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’कडे रीतसर तक्रारही केली आहे. त्यांच्या मते, टीव्ही-९, एनटीव्ही, १०टीव्ही आणि साक्षी टीव्ही या चार वाहिन्या राज्यातील बहुतांश दूरचित्रवाणी प्रेक्षकांना दिसू नयेत, यासाठी तेलुगु देसम पक्ष, भाजप आणि जनसेना यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनेच जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. आंध्र प्रदेश केबल टीव्ही ऑपरेटर्स असोसिएशनने राज्य सरकारच्या सांगण्यावरून हे केले असल्याचे त्यांचे म्हणणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा