तमिळनाडू की तामिळगम या वादात अखेर राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी माघार घेतली आहे. त्या राज्याचे तमिळनाडू हे नाव बदलण्याचा विचार नव्हता, असा खुलासा त्यांनी आता केला आहे किंवा त्यांना तो करावा लागला आहे. खरे तर देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा तमिळनाडूमध्ये प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा अधिकच तीव्र आहे. १९६७ पासून म्हणजे गेली पाच दशके या राज्यात द्रमुक किंवा अण्णा द्रमुक हे दोन प्रादेशिक पक्षच सातत्याने सत्तेवर आहेत. राष्ट्रीय पातळीवरील पक्षांनाही तिथे प्रादेशिक पक्षांची मदत घ्यावी लागते. असे असताना त्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव कुणी आणला तर त्यावर तेवढय़ाच तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. तमिळनाडूत सध्या लोकनियुक्त द्रमुक सरकार विरुद्ध राज्यपाल हा संघर्ष एवढय़ा टोकाला गेला आहे की, चेन्नईत ‘राज्यपाल हटाओ’, असे फलक जागोजागी लागले आहेत. दुसरीकडे तमिळनाडू विधानसभेत अभिभाषण वाचताना राज्यपालांनी त्यातील काही उतारेच वगळले. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सभागृहातच या गोष्टीला विरोध केला व तसा ठराव मांडला. वास्तविक मूळचे बिहारचे आणि सारी हयात भारतीय पोलीस सेवेत, गुप्तचर विभागात काढलेले राज्यपाल रवी हे त्याआधी कधीच वादग्रस्त नव्हते. तमिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यापासून मात्र त्यांच्यातील राजकारणीच अधिक सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा