खरे तर ‘इंडिया’ आघाडी टिकून राहिली वा नाही तरी काँग्रेसला आज घडीला तरी फारसा फरक पडणार नाही. काँग्रेसने सगळे लक्ष ‘इंडिया’ आघाडीतून मिळणाऱ्या कथित लाभापेक्षा स्वत:च्या पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याकडे केंद्रित केलेले दिसल्यास नवल नाही…
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला तेव्हा काँग्रेसने काय केले याची अधिक चर्चा झाली होती. ‘आप’च्या पराभवाला काँग्रेसने मोठा हातभार लावला असे मानले गेले. काँग्रेसने दिल्लीच्या काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या पराभवाचा एकप्रकारे बदला घेतला असे म्हटले गेले. अजय माकन, संदीप दीक्षित, पवन खेडा अशा काँग्रेसच्या दिल्लीतील काही नेत्यांना काँग्रेसने ‘आप’शी आघाडी करू नये असे वाटत होते. लोकसभा निवडणुकीतही ‘आप’शी युती करण्याला त्यांचा विरोधच होता. त्यामुळे काँग्रेसमधील एका गटाला ‘आप’विरोधात उभे राहायचे होते आणि आपचा पराभव झाला तर बरेच असेही त्यांना वाटत असावे. अर्थात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचेही मत तसेच असेल असे नव्हे. त्यांना कदाचित आघाडी करायचीही असेल; पण ही संधी ‘आप’नेही त्यांना दिली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा