तब्बल १६ वर्षांच्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर भारत आणि चार युरोपीय देशांची ‘युरोपियन फ्री टेड असोसिएशन’ (ईएफटीए) ही संघटना यांच्या दरम्यान मुक्त करारावर शिक्कामोर्तब झाले. ईएफटीएमध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिक्टनस्टाइन या चार देशांचा समावेश होतो. एखाद्या युरोपीय राष्ट्रसमूहाशी मुक्त व्यापार करारावर यशस्वी शिक्कामोर्तब होण्याची भारताची ही पहिलीच वेळ. अर्थात आकार लक्षात घेता, ब्रिटन आणि युरोपीय समुदाय (ईयू) या युरोपातील खऱ्या अर्थाने बड्या अर्थव्यवस्था आहेत. यांपैकी ब्रिटनशी मुक्त व्यापार चर्चा गेले अनेक महिने सुरू आहे. युरोपीय समुदाय किंवा ईयूबरोबर आपण तशी चर्चाच अद्याप सुरू केलेली नाही. यापूर्वी मॉरिशस, ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिराती या तीन देशांशी भारताचे मुक्त व्यापार करार झालेले आहेत. प्रस्तुत कराराचे नाणे अधिक जोमदारपणे वाजवले जात आहे, कारण त्याविषयी वाटाघाटी ‘त्या’ सरकारच्या पहिल्या कार्यकाळात (२००८) सुरू झाल्या आणि ‘त्या’च सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात (२०१३) गुंडाळाव्या लागल्या. या वाटाघाटींचे पुनरुज्जीवन ‘या’ सरकारच्या पहिल्या कार्यकाळात (२०१६) झाले आणि ‘या’च सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात (२०२४) त्या सुफळ संपूर्ण होत आहेत. शिवाय हल्ली सरकारी पातळीवर सारे काही आगामी वायद्याच्या भाषेत, म्हणजे पुढील १५ वर्षे, २५ वर्षे असेच बोलले जाते. तेव्हा कोणीतरी विद्यामान स्थितीवरही बोलण्याची गरज उरतेच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा