आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जून या प्रथम तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने ७.८ टक्के असा धडधाकट विकासदर नोंदवल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केले. रिझव्र्ह बँकेने ऑगस्टमध्ये व्यक्त केलेल्या आठ टक्क्यांच्या अंदाजाच्या तुलनेत हा दर किंचित थिटा पडला असला तरी त्याने जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून भारताचे बिरूद मात्र कायम राखले आहे. शिवाय मागील चार तिमाहीत नोंदविला गेलेला हा सर्वोच्च दर आहे. पण हे समाधान खरे तर औटघटकेचे ठरावे. ते का हे या आकडेवारीसंबंधाने देशाचे आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी केलेल्या टिप्पणीतूनच पुरते स्पष्ट होते. एकंदरीत ही आकडेवारी आश्वासक न भासता, आर्थिक विश्लेषकांमध्ये आगामी काळाबाबत चिंतेची लकेर निर्माण करणारी आहे, ते कशामुळे हे पाहूया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा