जगातील सर्वाधिक सधन आणि शक्तिशाली अशा भारतीय क्रिकेटविश्वात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहिल्यावर धन आणि ताकद स्थैर्य व यशाची हमी देऊ शकत नाहीत, याची जाणीव होते. भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमरा हा गेले काही महिने पाठीच्या दुखापतीने ग्रस्त होता. त्यामुळे त्याला टी-२० विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेखेरीज इतर फुटकळ स्पर्धा वा मालिकांमधून खेळवले गेले नाही. टी-२० प्रकारातील गत विश्वचषक ऑस्ट्रेलियात झाला, तेथे बुमराची कामगिरी नेहमीच चांगली होते. अशा महत्त्वाच्या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियातील गोलंदाजीचा अनुभव असलेला बुमरासारखा मोक्याचा मोहरा उपलब्ध न होणे हे येथील क्रिकेटव्यवस्थेचे मोठे अपयश होते. आता हाच बुमरा त्याच्यावरील गोलंदाजी भाराचे ‘योग्य नियोजन’ व्हावे यासाठी विद्यमान श्रीलंका आणि नजीकच्या न्यूझीलंड मालिकेतच नव्हे, तर आगामी ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठीही उपलब्ध होणार नाही, अशी हवा बनवली जात आहे. ‘हवा बनवली जात आहे’ हा वाक्प्रयोग नाइलाजास्तव करावा लागतो. कारण हल्ली भारतीय संघनिवड, संघरचना, खेळाडूंच्या दुखापती-उपलब्धतेबाबत अधिकृत फारसे काही सांगितलेच जात नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा