लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपेतर ‘इंडिया’ आघाडीच्या चिंधडया उडत असताना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (‘जेएनयू’तील) डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी ‘जेएनयू स्टुडंट्स युनियन’च्या निवडणुकीत दाखवलेली एकजूट वाखाणण्याजोगी म्हणता येईल. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेस तिघेही ‘इंडिया’चे घटक असले तरीही लोकसभा निवडणुकीत ते एकमेकांविरोधात लढत आहेत. बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची जागावाटपाची बोलणी फिसकटली आहेत. तिथे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार आणि शिवसेना-ठाकरे गट यांच्यामध्ये जागावाटपाच्या असंख्य चर्चा झाल्या आहेत. भाजपविरोधात तगडा पर्याय उभा करण्यासाठी पाटण्यात झालेल्या पहिल्या बैठकीनंतर विरोधकांच्या एकजुटीचा भाजपने धसका घेतला होता. पाच वर्षांत भाजपने ज्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्षांकडे ढुंकूनही पाहिले नव्हते, त्यांचा दिल्लीत पंतप्रधान मोदींनी मेळावा घेतला होता. आता तर भाजप देशभर नवे मित्र शोधून काढून त्यांच्या झोळीत जागा टाकत आहे. या पार्श्वभूमीवर ‘जेएनयू’ निवडणुकीत चारही डाव्या विद्यार्थी संघटनांनी संयुक्तपणे लढून अध्यक्ष-उपाध्यक्ष, महासचिव-सहमहासचिव या चारही पदांवर मिळवलेला विजय लक्षणीय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा