तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या जीवनात आलेल्या राजकारण, समाजकारण, धर्मकारण, इतिहास, शिक्षण, साहित्य, चित्रकला, योग, अध्यात्म, पत्रकारिता क्षेत्रांतील मान्यवरांबद्दल वेळोवेळी सुमारे पन्नासएक व्यक्तिलेख लिहिले आहेत. त्यात सातएक लेख यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलचे आहेत. यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ यांच्यातील बंध लक्षात घेता, तर्कतीर्थ हे यशवंतराव चव्हाण यांचे ‘राजकीय गुरू’ होत, असे बोलले जाते. हे खरे आहे की, यशवंतराव चव्हाण शाळकरी विद्यार्थी असताना तर्कतीर्थांची भाषणे ऐकून प्रभावित होऊन स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले नि अल्पवयातच त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर इतका होता की, १९४२च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या रणधुमाळीत त्यांचा विवाह झाला, तेव्हा त्यांच्या लग्नपत्रिकेच्या शीर्षावर अमुक-तमुक देवता प्रसन्न नसून, ‘वंदे मातरम्’ लिहिले होते. ही लग्नपत्रिका जिज्ञासू यशवंतराव चव्हाण स्मृतिसंग्रहालय, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे आजही पाहू शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा