‘प्रजासत्ताकाचा पायाच पोकळ’ हा अग्रलेख (३१ जानेवारी) वाचला. शहरी आणि निमशहरी भागातील सर्वच व्यवस्थांची कशी दुर्दशा झाली आहे हे गेल्या काही दिवसांतील बातम्यांमुळे सतत प्रकर्षाने पुढे येते आहे. ‘महापालिका हद्दीतील गावांना शहरातील इतर भागांसारखा बंद नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा का नाही?’ असा प्रश्न लेखात उपस्थित केला आहे. परंतु वास्तव असे आहे की शहरांतील अत्यंत महागड्या भागांतही गृहसंकुलांना टँकरचे पाणी नियमितपणे घ्यावेच लागते व त्यासाठी आवश्यक ती कायमस्वरूपी जोडणी रस्त्यालगत करूनच ठेवलेली असते! ज्या यंत्रणांनी या अनागोंदीला आवर घालावा वा शिस्त लावावी अशी अपेक्षा असते त्या यंत्रणा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामील वा टोकाच्या अलिप्त असल्याशिवाय अशी स्थिती निर्माण होऊ शकत नाही.- प्रसाद दीक्षित, ठाणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा