‘मराठीचा पेपर फुटल्याच्या चर्चेने गोंधळ’ ही बातमी (लोकसत्ता- २२ फेब्रुवारी) वाचली. दरवर्षी परीक्षांच्या हंगामात पेपरफुटीची प्रकरणे उघड होतात आणि तितक्याच तत्परतेने प्रशासन ती फेटाळूनही लावते. यंदाही वेगळे काही घडले नाही. प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याआधीच बाहेर आल्या, झेरॉक्सच्या दुकानांवर त्यांची उत्तरे विकली गेली आणि शेवटी ‘पेपरफुटी झालेली नाही’ असा दावा अधिकाऱ्यांनी केला. या सगळ्याचा खरा फटका ज्यांनी संपूर्ण वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांना बसतो. मेहनत करून गुण मिळवण्याऐवजी ‘जुगाड’ करणाऱ्यांना फायदेशीर परिस्थिती निर्माण होते. शिक्षकांनी शिकवायचे, विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आणि परीक्षेसाठी नियोजन करायचे या संकल्पनाच यामुळे ढासळू लागल्या आहेत. एकीकडे शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या गप्पा मारल्या जातात, पणअशा प्रकारांमुळे शिक्षणाची विश्वासार्हताच धोक्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा