‘बहुसंख्याकवाद उलटला!’ हे संपादकीय (१२ जुलै) वाचले. यातील घडामोडी श्रीलंकेतील असल्या तरी कोणाही सुजाण भारतीयाचे मन अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आज त्या देशाची अवस्था ज्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय धोरणांमुळे झाली आहे, त्यांच्याशी मिळतीजुळती धोरणे आपल्या विद्यमान शासन व्यवस्थेकडून राबवली जात आहेत. विविध शासकीय कंपन्यांच्या संदर्भातील धोरणे, बेरोजगारी, सरकारी नोकरभरती प्रक्रियेविषयीची उदासीनता, निवडणुकीच्या राजकारणात धर्माच्या आधारे बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्य मतांचे केले जाणारे ध्रुवीकरण अशा नकारात्मक गोष्टींमुळे भारताची वाटचालही श्रीलंकेच्या दिशेने होत आहे की काय अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहात नाही. श्रीलंकेतील सामान्य जनता आज जात्यात आहे आणि आपण सुपात आहोत, एवढाच काय तो फरक.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा