‘बिनीचे शिलेदार आणि बिन्नी ..!’ हे संपादकीय वाचले. सीबीआय, ईडी, आयकर विभाग, प्रसार भारती, निवडणूक आयोग अशा सर्वच स्वायत्त केंद्रीय संस्था भाजपप्रणीत केंद्र सरकारच्या तालावर नाचत आहेत. त्यात आता भारतात क्रिकेट नियामक मंडळ अर्थात ‘बीसीसीआय’ची भर पडली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा (बीसीसीआयचे सचिव), मुंबईचे भाजप प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार (खजिनदार) , केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे नातेवाईक अरुण धुमल यांसारखी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची नावे पाहिल्यावर ‘बीसीसीआय’ ही ‘बीजेपी’ची ‘बी टीम’ तर बनली नाही ना असा प्रश्न पडतो! बीसीसीआयची निवडणूक का झाली नाही? ती बिनविरोध झाली असेल तर त्यामागे आर्थिक व राजकीय गणित आहे का? बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली यांना दुसऱ्यांदा संधी नाकारणारी बीसीसीआय जय शहा यांना सचिव पदासाठी दुसऱ्यांदा संधी का देते? गेल्या काही वर्षांपासून बीसीसीआयच्या धोरणात्मक निर्णयांबाबत व इतर बाबींसंदर्भात माध्यमांना प्रश्न विचारण्याची संधीच का दिली जात नाही? इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या अधूनमधून खपल्या काढणाऱ्या भाजपची सध्याची ही कार्यपद्धती ‘अघोषित आणीबाणी’च नाही का? काँग्रेसच्या घराणेशाहीबद्दल तावातावाने बोलणाऱ्या भाजपची ही बीसीसीआयमधील नवीन घराणेशाही नाही का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा