आषाढातही कोसळणे, श्रावणातही कोसळणे, भाद्रपदातही कोसळणे आणि मग कधीही, कोणत्याही काळी, जरा वाऱ्यांनी हवेत आर्द्रता भरण्याचा अवकाश, की पुन्हा फक्त कोसळणेच! पाऊसही आताशा एकसुरी किंबहुना ‘एकसरी’ झालेला आहे. झिमझिमणे, रिमझिमणे, रुणझुणणे बंद होऊन केवळ कोसळणे उरले की असे होते. ‘कमी वेळात खूप जास्त पाऊस’ हे समीकरण गेल्या सुमारे दशकभरापासून रुळू लागले आहे. खरे तर असे होणार, याचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पावसाच्या अनेक अभ्यासांतून, शोधनिबंधांतून १५ वर्षांपूर्वीच वर्तवून ठेवले होते. पण यंत्रणेला तसेही शास्त्रीय दृष्टिकोनाचे वावडे असल्याने या अभ्यासांतील इशाऱ्यांनी जागे होऊन, त्याप्रमाणे व्यवस्थांमध्ये सुधारणा कराव्यात, असे कधीही सुचले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा