महायुतीला विक्रमी बहुमत मिळाल्याने भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीची मंडळी अजूनही हवेतच आहेत. सुमारे ४८ टक्के मते मिळवून सत्तेत आलेल्या महायुतीला चांगले काम करून दाखविण्याची सुसंधी होती. पण मुख्यमंत्री निवड, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, पालकमंत्र्यांची नियुक्ती यालाच विलंब लागला. आघाडी सरकार चालवताना किती आव्हानांचा सामना करावा लागतो याचा अनुभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एव्हाना आला असेलच. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे गेला दीड महिना सातत्याने वादात अडकले असले तरी त्यांचे सारे ‘प्रताप’ फडणवीस यांना मुकाटपणे सहन करावे लागत आहेत. मुंडे प्रकरण तापले असतानाच आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी दोषी ठरविल्याने सरकारच्या प्रतिमेला आणखी एक धक्का बसला. धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे या राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या उद्याोगांमुळे महायुती सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे. सरकारी १० टक्के कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी कोकाटे यांनी १९९५च्या दरम्यान बनावट कागदपत्रे दिल्याचा आरोप होता. वास्तविक कोकाटे कुटुंबीय सधन असताना त्यांनी व त्यांच्या बंधूने बनावट दस्तऐवज सादर करून वार्षिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा कमी असल्याची कागदपत्रे सादर केली होती. जवळपास तीन दशकांनी या खटल्याचा निकाल लागला आणि न्यायालयाने कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा