दुसऱ्यावर टीका करण्याचा अधिकार नैतिकतेतून मिळत असतो. ती करण्याआधी आपण स्वत: किती स्वच्छ हे तपासून बघण्याची सवय अंगी बाणावी लागते. ही आत्मपरीक्षणाची सवय आता राजकारणातून जवळपास हद्दपार झालेली आहे. व्यवहारवादाला आदर्श मानणाऱ्या राजकारण्यांनी ती पार विकून खाल्लेली दिसते. अशांच्या या क्षेत्रात आता नीलम गोऱ्हे शिरोमणी होऊ पाहतात की काय? दिल्लीत पार पडलेल्या साहित्य संमेलनातील त्यांचे ताजे वक्तव्य या शंकेला बळ देते. कुणा एकेकाळी स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेत रामदास आठवले, प्रकाश आंबेडकरांच्या साथीने समाजकारण व राजकारण करणाऱ्या गोऱ्हेंना नंतर हिंदुत्ववादी असल्याचा साक्षात्कार झाला व त्या शिवसेनेत गेल्या. तिथे दीर्घकाळ सत्ता भोगल्यावर ती टिकवण्यासाठी त्या शिंदेंच्या म्हणजे ‘अधिकृत’ सेनेत प्रवेश करत्या झाल्या. इतक्या वैचारिक कोलांटउड्यांनंतर निदान शांत बसावे व वाट्याला आलेल्या पदाचा सुखेनैव उपभोग घ्यावा तर तसेही नाही. आता त्यांना आणखी प्रखर हिंदुत्ववादी होण्याचे वेध लागलेले दिसतात. संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी केलेले राजकीय वक्तव्य हेच दर्शवते. ठाकरेंच्या शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडिज द्याव्या लागतात असे म्हणणाऱ्या गोऱ्हेंनी प्रत्येक वेळी विधान परिषद मिळवण्यासाठी आजवर किती गाड्या दिल्या, असा प्रतिप्रश्न कुणी करू शकेल याचेही भान राहिले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा