शाळा आहे; पण शिक्षक नाही! धोरण आहे; पण समन्वय नाही! या सगळ्यात शिक्षण आहे का? माहीत नाही! देशाची शैक्षणिक राजधानी ज्या राज्यात आहे, त्या महाराष्ट्राचे हे चित्र आहे. गेल्या तीन दिवसांत शालेय शिक्षणाच्या संदर्भात आलेल्या बातम्यांवर नजर टाकली, तरी ‘श्रीमंत’ महाराष्ट्राची ही शैक्षणिक कंगाली लक्षात येईल. पहिली बातमी म्हणजे, ‘आडमार्गाने शाळा बंद करण्याचा घाट’ घातल्याची. हे समजले, ते राज्यात सुरू असलेल्या शाळांच्या संचमान्यतेच्या प्रक्रियेमुळे. विद्यार्थीसंख्येनुसार शाळेत किती शिक्षक असावेत, याची संख्या काढून तेवढ्या शिक्षक पदांना मंजुरी देणे अशी ही प्रक्रिया. या संचमान्यतेसाठी शाळांना तपशील भरण्यास सांगण्यात आले आहे. ते करताना असे लक्षात आले, की इयत्ता सहावी ते आठवीच्या ज्या शाळांत वीसपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या आहे, त्या शाळांना शिक्षक पदेच मंजूर नाहीत. आता राज्यात वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा नाहीत, असे नाही आणि ज्या आहेत, त्या बंद केल्या जाणार नाहीत, असे सरकारच म्हणते. पण शिक्षकच दिले जाणार नसतील, तर या शाळा चालणार कशा, याचे उत्तर मात्र सरकार देत नाही. कमी पटसंख्येच्या शाळांत पूर्वी कंत्राटी शिक्षक नेमण्याची तरतूद होती. पण तो निर्णयही सरकारने रद्द केला आहे. हे म्हणजे, रस्ता केला आहे, पण त्या मार्गावरून कोणतेच वाहन न्यायचे नाही, असे झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा