ओडिया लेखिका प्रतिभा राय यांना यंदाच्या मुंबई ‘लिट लाइव्ह’या साहित्य सोहळ्यात कारकीर्द गौरव पुरस्कार मिळाला. यापूर्वीच ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांच्या साहित्यसेवेचा उचित गौरव करण्यात आला आहे. स्त्रियांवरील अत्याचार, सामाजिक अन्याय, भ्रष्टाचार, धार्मिक भेदभाव याविरुद्ध ठाम भूमिका घेणाऱ्या साहित्यिकांमध्ये राय यांची गणना होते. ओदिशाची प्राचीन संस्कृती आणि आधुनिक जग यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न त्यांच्या लेखनातून दिसतो. राय यांनी १९७४मध्ये लिहिलेल्या बर्षा बसंत बैसाख या पहिल्याच कादंबरीने त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. महाभारतातील अनेक पात्रे लेखकांच्या कौशल्याला आवाहन करत असतात. राय यांनी १९८४साली द्रौपदीवर बेतलेल्या याज्ञसेनी या महाकाव्याने देशभरच्या साहित्यविश्वात स्वत:चे स्थान निर्माण केले. याज्ञसेनीमध्ये द्रौपदीचा जीवनप्रवास आणि आधुनिक काळातील भारतीय स्त्रीची चौकट यांची सांगड घालत, स्त्रीची वैयक्तिक ओळख काय या सनातन प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा