सन २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पद्माकर शिवलकर आणि राजिंदर गोयल या दोघांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना निवृत्त होऊन काही दशके लोटल्यानंतर जीवनगौरव देण्यात त्यांच्या गौरवशाली कारकीर्दींना दाद देण्याचा हेतू होताच. पण कुठे तरी ते भारतीय क्रिकेट व्यवस्थेचे ‘पापक्षालन’ही ठरले. शिवलकर आणि गोयल हे दोघेही असामान्य प्रतिभेचे डावखुरे फिरकीपटू. त्यांची कारकीर्द साठ आणि सत्तरच्या दशकात बिशनसिंग बेदी यांच्यामुळे झाकोळली गेली. स्थानिक क्रिकेट गाजवूनही बेदींमुळे त्यांना भारतीय संघात संधीच मिळाली नाही. बेदी स्वत: निर्विवाद प्रतिभेचे डावखुरे फिरकीपटू होते. त्यांना वगळून शिवलकर किंवा आणखी कुणास संधी मिळावी असे प्रसंगच उद्भवले नाहीत. बेदींच्या निवृत्तीनंतर त्या वेळच्या युवा गोलंदाजांना अधिक पसंती दिली गेली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा