महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण का पराभूत झालो याचे मूल्यमापन करण्याची बहुधा काँग्रेसला गरज वाटत नसावी. नाहीतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांची भाजपविरोधातील रणनीती फसली नसती. ज्या कारणांमुळे काँग्रेसचा पराभव झाला तेच मुद्दे काँग्रेस संसदेमध्ये मांडू पाहात आहे. त्यातून नेमके काय साध्य होणार आहे, असे ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसच्या धुरिणांना विचारत आहेत. तरीही त्याकडे लक्ष देण्याची तसदी त्यांनी घेतलेली नाही. हे पाहिले तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे विधान काँग्रेस खरे ठरवणार असे दिसते. पाच वर्षांपूर्वी शहा म्हणाले होते की, पुढील ५० वर्षे तरी काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळणार नाही! …लोकांना न भिडणारे प्रश्न काँग्रेस विनाकारण मांडत राहिला तर मतदार भाजपलाच मते देतील. मग, आम्ही हरलो असा गळा काढण्याशिवाय काँग्रेसला काहीही करता येणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा