दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे अत्यंत चतुर राजकारणी आहेत. मोदींपेक्षादेखील! रेवड्या वाटून निवडणूक जिंकता येते याची भाजपला कल्पनाही नव्हती तेव्हा केजरीवालांनी दिल्लीत सलग दोनदा विधासभेच्या निवडणुका जिंकून दाखवल्या. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपला धो-धो यश मिळाल्यावर त्यांच्या निवडणूक जिंकण्याच्या कथित प्रारूपाची चर्चा होऊ लागली आहे. पण, या रेवड्यांचे जनक केजरीवाल होते, त्यांनी लोकांना कसे खूश करायचे याचा मार्ग शोधला. मध्य प्रदेश जिंकेपर्यंत भाजपला केजरीवालांचे प्रारूप हुबेहूब अमलात आणता आले नव्हते; पण मध्य प्रदेशात हातातून निसटलेली निवडणूक खेचून घेण्याचे काम रेवड्यांनी इतक्या अफलातूनपणे केले की नंतर भाजपने मागे वळून पाहिलेच नाही! महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजना राबवून महायुतीने जवळपास एकहाती सत्ता आणली. केजरीवाल रेवड्यांचा नवा खेळ खेळू लागले आहेत. दिल्लीतील ‘रेवड्यांचा राजा’चा नवा अवतार पाहायला मिळू शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा