‘भाजपने गमावलेल्या संधीचे ‘स्मारक’’ हा ‘लालकिल्ला’मधील महेश सरलष्कर यांचा लेख वाचला. भाजपने सर्वसामान्यांवर ज्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतात तिथे डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले. हे भारताच्या परंपरेला शोभणारे नव्हे. माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचे निधन झाले तेव्हा काँग्रेस सरकारने त्यांच्या अंत्यविधीसाठी खास जागा दिली व तिथेच त्यांचे स्मारक उभे केले तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार झाले तेव्हाही बाळासाहेबांच्या विरोधातले सरकार केंद्रात व राज्यात होते. डॉ. सिंग यांच्या बाबतीत, ही परंपरा भाजपला जोपासता आली नाही. भाजपकडून काँग्रेसबद्दल जी आगपाखड होत आहे ती भाजपची सारवासारव आहे. जागतिकीकरणानंतर अवघे जग गोंधळले होते. त्या कोलाहलात भारताला आपला सूर डॉ. मनमोहन सिंग यांच्यामुळे सापडला. जगाला हेवा वाटावा असे त्यांचे कार्य आहे. तरीही त्यांच्या वाट्याला हेटाळणी, अवमान, उपहास आणि मृत्यूनंतरही अवहेलना आली. भविष्यातील मनमोहन सिंग यांचे भव्य स्मारक उभे राहील आणि अवघ्या जगासाठी ते प्रेरणादायी ठरेल, पण भाजपला संधी साधता आली नाही, हेच खरे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा