‘गावगुंडांमुळे उद्याोजक त्रस्त, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मराठवाड्यात बैठक, कंपन्यांकडून तक्रारी’ (९ मार्च) यांसारख्या बातम्या वाचताना, महाराष्ट्रात पोलीस खाते नक्की कोणासाठी असते हा प्रश्न पडतो. खरे तर अशा बैठका काही ठरावीक कालावधीने होणे गरजेचे असताना यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट का पाहिली जाते? राजाश्रय मिळवलेल्या गावगुंडांचा त्रास हा केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित नसून त्याचे चटके महाराष्ट्रात सर्वत्र जाणवत आहेत. काहीतरी विपरीत घडल्यावर शासकीय यंत्रणा देखाव्यापुरती जागी होऊन पुन्हा त्याच चुकीच्या मार्गाने चालणे हे दुर्दैवी कालचक्र तेव्हाच थांबेल जेव्हा, या दुष्ट प्रवृत्तीला राजकीय आश्रय मिळण्याचे बंद होईल! सध्या तरी हे थांबणे अवघड दिसते. कारण सत्तेतून संपत्ती व संपत्तीतून पुन्हा सत्ता या चक्राला खतपाणी पोसलेल्या गुंडांकडूनच मिळते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा