‘पंचतारांकितांचे पायाभूत’ या अग्रलेखातून (२९ ऑक्टोबर) सरकार फक्त उच्चभ्रूंसाठी आखत असलेल्या धोरणांचे वास्तव मांडले आहे. उत्तर प्रदेशच्या मताधिक्यावर पंतप्रधान झालेले मोदी हे बुलेट ट्रेन, चांद्रयान, मोठी अर्थव्यवस्था अशा भपकेबाज जाहिरातींमध्ये धन्यता मानत आहेत; तर आपल्या प्रदेशातील नागरिकांना देशोधडीला लावून योगी आदित्यनाथ हे गंगापूजनात लाखो दिव्यांची विक्रमी आरास करण्यात इतिकर्तव्यता मानत आहेत. जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा अजूनही लटकता ठेवून ओबीसी प्रवर्गाबद्दलची अनास्था या सरकारने दाखवली आहे. ही चेंगराचेंगरी कुठपर्यंत सहन करायची हे मतदारांनी ठरवण्याची वेळ आली आहे. – किशोर थोरात
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा