सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये न्यायव्यवस्थेत मोलाची भूमिका पार पाडतात. याशिवाय दुय्यम न्यायालयेही महत्त्वाची भूमिका पार पाडतात. संविधानातील अनुच्छेद २३३ ते २३७ या पाच अनुच्छेदांमध्ये दुय्यम न्यायालयांच्या बाबत तरतुदी आहेत. या दुय्यम न्यायालयांमध्ये प्रामुख्याने जिल्हा न्यायालयांचा समावेश होतो. जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्त्या राज्यपालांमार्फत होतात. राज्यपाल या नियुक्त्या करताना उच्च न्यायालयाचा सल्ला विचारात घेतात. जिल्हा न्यायाधीश पदी पात्र ठरण्यासाठी काही अटी आहेत. पहिली अट म्हणजे ही व्यक्ती राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या सेवेत असता कामा नये. वकिलीचा सात वर्षांचा अनुभव असणे ही दुसरी अट. तसेच तिसरी अट आहे ती उच्च न्यायालयाकडून शिफारसपत्राची. जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती होण्यासाठी उच्च न्यायालयाची शिफारस मिळणे आवश्यक असते. जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त इतर न्यायाधीशांची नेमणूक ही राज्यपाल, राज्याचा लोकसेवा आयोग आणि उच्च न्यायालय यांच्या विचार विनिमयातून होते. शहराच्या दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, सहायक जिल्हा न्यायाधीश, सत्र न्यायाधीश अशा अनेक पदांवरील व्यक्ती ही जिल्हा न्यायाधीश असू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा