रोजगाराकडे मूलभूत हक्क म्हणूनच पहावे असा युक्तिवाद केला गेला; मात्र व्यावहारिकदृष्ट्या हे शक्य होईल का, यावर एकमत झाले नाही…

भारत सरकारने २०१९ साली बेरोजगारीच्या अनुषंगाने एक अहवाल प्रकाशित केला. सरकारी यंत्रणांनी सर्वेक्षण करून तयार केलेला हा अहवाल होता. त्यानुसार भारतातील बेरोजगारीच्या दराने उच्चांक गाठला होता. साधारणपणे ४५ वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारी निर्माण झाल्याचे हे आकडे होते. बेरोजगारीचा प्रश्न सुरुवातीपासूनच महत्त्वाचा होता. अलीकडच्या काही वर्षांत या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. भारताच्या संविधानसभेतही यावर चर्चा झाली होती. लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सरकारने पावले उचलली पाहिजेत, असे म्हटले गेले. त्यासाठीची तरतूद मूलभूत हक्कांच्या विभागात होऊ शकली नाही; मात्र मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तिचा समावेश झाला. संविधानाचा ४१ वा अनुच्छेद कामाच्या आणि शिक्षणाच्या बाबतीत हक्क देण्यासाठी राज्यसंस्थेने कायदे करावेत, असा उपदेश करतो. विकलांगता, बेकारी, वार्धक्य इत्यादी कारणांमुळे हलाखीचे जिणे वाट्याला आले असेल तर त्या व्यक्तीला लोकसाहाय्य मिळावे, यासाठी राज्यसंस्थेने तरतूद करावी. थोडक्यात, हा अनुच्छेद प्रामुख्याने तीन बाबींविषयी भाष्य करतो: १. रोजगाराचा हक्क २. शिक्षणाचा हक्क आणि ३. लोकसाहाय्याचा हक्क.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sanvidhan bhan employment education and public assistance amy
First published on: 04-07-2024 at 05:45 IST