‘जातीय आणि धार्मिकतेच्या आधारे राजकारणाचे प्रदूषण’ केले जाऊ नये, हे संविधानाच्या अनुच्छेद-२६ मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे..

भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, याची ग्वाही संविधानाने दिली आहे. या अनुषंगाने बोम्मई खटला महत्त्वाचा आहे. याचा संदर्भ संघराज्यवादाच्या अनुषंगाने दिला जातो; मात्र धर्मनिरपेक्षतेबाबतही हा खटला महत्त्वपूर्ण आहे. याच्या निकालपत्रात (१९९४) म्हटले होते की, अनुच्छेद २५ नुसार कोणत्याही धार्मिक प्रथेचे पालन करण्यावर बंदी नाही. राज्यसंस्था धर्मनिरपेक्ष आहे, दैवी स्वरूपाची नाही. अर्थातच राज्यसंस्थेचा पाया हा कोणताही धर्मग्रंथ नाही. देशाचे संविधान हे आपणा सर्वाचे अधिष्ठान आहे. याअनुषंगाने भाष्य करताना न्यायालयाने अनुच्छेद २६ नुसार असलेल्या धार्मिक व्यवहारांचे नियमन करण्याच्या स्वातंत्र्याचाही उल्लेख केला.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sanvidhan bhan separation of religion and politics amy
First published on: 06-06-2024 at 00:53 IST