ब्रिटिशांनी भारतामध्ये प्रशासकीय व्यवस्था रुजवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. भारतासारख्या महाकाय प्रदेशावर राज्य करण्यासाठी प्रशासनावर पकड बसवणे आवश्यक होते. त्यासाठी मुळात या व्यवस्थेचा आराखडा आखणे आवश्यक होते. त्याचाच भाग म्हणून त्यांनी पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रसार केला. इंग्रजीचे प्राबल्य निर्माण केले. ब्रिटिशांनी भारतीय नागरी सेवांची (आयसीएस) व्यवस्था स्थापित केली. लॉर्ड वेलेस्ली यांना या सेवांसाठी उच्च शिक्षण, तज्ज्ञता आणि एकुणात ब्रिटिश साम्राज्याच्या प्रशासनाशी अनुकूल अशा क्षमता असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता जाणवत होती. त्यातूनच पुढे ‘कॉलेज ऑफ फोर्ट विल्यम’ स्थापन करण्यात आले. या महाविद्यालयात तीन वर्षांचा अभ्यासक्रम आखण्यात आला. तो ऑक्सफर्ड आणि केंब्रिजमधील शिक्षणाच्या धर्तीवर तयार केलेला होता. त्यानंतर इंग्लंडमधील हेलिबरी येथील ईस्ट इंडिया कॉलेज येथे भारतीय नागरी सेवांसाठीचे प्रशिक्षण देण्यात येऊ लागले. या सेवांसाठी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून निवड होत असे, मात्र सुरुवातीला संचालकांची शिफारस आवश्यक असे. त्यामध्येही बरेच बदल झाले. केवळ भारतीय नागरी सेवाच नव्हे तर एकुणात भारतातली लोक सेवांची व्यवस्था ब्रिटिश काळात मजबूत झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा