हे प्रशासनातले ‘बाबू’ संतांना समजतात काय? देवाचा संदेश जनतेपर्यंत पोहचवण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या महंताचा अपमान करण्याची हिंमत होतेच कशी यांची? अयोध्येतील हनुमानगढीचे प्रमुख राजू दास यांच्याविषयी देशात किती आदर आहे हे ठाऊक नाही का यांना? मग सुरक्षारक्षक काढून त्यांचा उपमर्द केलाच कसा? हा अपमान म्हणजे धर्माभिमानी राष्ट्राच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीतील मोठा अडथळाच. असतील ते जिल्हाधिकारी पण त्यांच्यावर योगींनी तातडीने कारवाई करायलाच हवी. अयोध्येतला पराभव पक्षापेक्षाही या संतांना जिव्हारी लागला, पण त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होणार, गर्दी ओसरणार हा केवळ कल्पनाविलास. हो, केली असेल त्यांनी कुणाला दमदाटी, दिल्या असतील काहींना शिव्या, दाखवला असेल काही राष्ट्रद्रोह्यांना बंदुकीचा धाक तर यात त्यांची चूक काय? धर्माच्या प्रसारासाठी हे करणे क्षम्य ठरवले आहे पुराणात याची कल्पना या उच्चशिक्षित म्हणवणाऱ्या बाबूंना कधी येणार? या साऱ्यांना आता संतांच्या वचनाला प्रमाण समजणारी आध्यात्मिक लोकशाही शिकवण्याची गरज आहे. तेव्हाच दुरुस्त होतील हे. सुरक्षा घेऊन फिरणारे राजकारणी तर सर्रास गुन्हे करतात. त्यांचा रक्षक काढण्याची हिंमत हे बाबू कधी दाखवणार?

हेही वाचा >>> अन्वयार्थ – शक्तिपीठ महामार्ग: प्राधान्यक्रमांचा प्रश्न!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta satire article on ayodhya hanumangarhi chief priest who loses security cover after clash with district magistrate zws
First published on: 25-06-2024 at 01:01 IST