नेहमीप्रमाणे भरलेला भक्तांचा दरबार ऐन भरात असताना एक शिष्य लगबगीने येऊन बाबा बागेश्वरांच्या कानात कुजबुजला. ‘दिल्लीहून चाणक्यांच्या कार्यालयातून फोन आहे’ हे ऐकताच बाबा ताडकन उठले. यांच्याच सांगण्यावरून आपण चेंगराचेंगरीत मेलेल्यांना मोक्ष मिळाल्याचे वक्तव्य केले. त्यावर या अविमुक्तेश्वरानंदांनी थेट आव्हानच दिले. या गंगेत, मारतो धक्का व मोक्ष मिळवून देतो म्हणून. आता यावर हे चाणक्य पुन्हा कामाला लावणार असे म्हणत त्यांनी फोन घेतला. ‘ये देखो बाबा, हा जो कुणी अविबाबा आहे, तो सतत आपल्या विरोधात गरळ ओकत असतो. बाकी सारे साधूसंत आपल्या बाजूने झालेत. हाच जरा वाकडा चालतोय. आता याला सरळ करण्याची नामी संधी आलीय. तुम्ही फक्त त्याचे आव्हान स्वीकारा. बाकी घाटावरचे आम्ही बघून घेऊ.’ हे ऐकताच बागेश्वरांचे डोळे चमकले. त्यांनी लगेच आजूबाजूला घुटमळत असलेल्या दांडकेश्वरांना बोलावून आव्हान स्वीकारल्याचे जाहीर केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा