‘रत्नागिरी नगरीतील थिबा महालासमोर आज जमलेल्या हापूस कुलोत्पन्नांतील सर्वाचे मी स्वागत करतो. आमच्या विनंतीला मान देऊन कर्नाटकातील सदस्यसुद्धा मोठय़ा संख्येने सहभागी झाले याचा अत्यानंद आम्हा कोकणींना झाला आहे. सध्या आपल्यावरून मानवजातीने निर्माण केलेल्या वादावर विचार करण्यासाठी आपण येथे जमल्याचे तुम्ही सर्व जाणताच. वादाचे विषय अपुरे पडू लागल्यानेच माणसांनी आता फळांकडे लक्ष वळवल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रंग, रूप व वाणांवरून भेद करण्याची मानवी परंपरा आपल्या कुळात नाही याची जाणीव या मर्त्यांना करून देण्याची वेळ आली आहे. माणसांची ठेवण, रंग, चेहरा प्रांतनिहाय वेगळा असतो तसे आपल्याही बाबतीत घडू शकते हे सत्य ही जमात विसरली आहे. पश्चिम घाट एकच असला तरी प्रत्येक ठिकाणचे वातावरण वेगळे आहे याची कल्पना माणसांना येऊ नये याचे आश्चर्य वाटते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा