नियोजन, अचूकता आणि प्रावीण्य यांचे महत्त्व भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल रणजितसिंह बेदी (निवृत्त) यांना चांगलेच ज्ञात होते. ‘दुसऱ्या संधी’वर त्यांनी कधीच विश्वास ठेवला नाही; त्यामुळे सहकाऱ्याच्या विमानाची धडक बसल्यानंतरही जमिनीवर कोसळण्याच्या बेतात असणाऱ्या आपल्या ‘मिग २१’चे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी नियंत्रण गमावले नाही! विलक्षण कसब दाखवत अपघातग्रस्त विमान चंडीगढ हवाई तळावर आणले. १९७० मध्ये प्रजासत्ताक दिन सोहळय़ाच्या मानवंदना उड्डाणातील (फ्लायपास्ट) रंगीत तालमीत ही घटना घडली होती. शौर्य व हवाई कौशल्य दाखविणारे एअर मार्शल रणजितसिंह बेदी यांचे नुकतेच निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. राजपथावर हिऱ्याच्या आकारात (डायमंड फॉर्मेशनमध्ये) मिग २१ विमाने मार्गक्रमण करीत असताना हा अपघात झाला होता. या फॉर्मेशनचे नेतृत्व बेदी यांच्याकडे होते. प्रचंड ताणतणाव, दबाव असताना शांत, धीरोदात्तपणे कार्यरत राहण्याचा आदर्श त्यांनी वैमानिकांसमोर ठेवला. याबद्दल त्यांना वायू सेना पदकाने सन्मानित करण्यात आले. भारत-पाकिस्तानच्या १९६५ आणि १९७१ मधील युद्धात त्यांचा सहभाग होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा