‘हे दु:साहस करणाऱ्यास अशी अद्दल घडवली जाईल, ज्यामुळे त्याच्या समूळ अस्तित्वाविषयीच कायमस्वरूपी प्रश्नचिन्ह निर्माण होईलङ्घ’ जानेवारी २००२ मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख जनरल सुंदरराजन पद्मानाभन यांनी एका पत्रकार परिषदेत, पाकिस्तानने अण्वस्त्र हल्ला केल्यास भारत काय करणार, या प्रश्नावर प्रस्तुत उत्तर दिले. तो काळ अत्यंत तणावाचा होता. १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचेही त्याच वेळी स्पष्ट झाल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर कोणत्या तरी स्वरूपाचा प्रतिहल्ला करावा याविषयी देशात खल सुरू होता. यासाठी सीमेवर सैन्याची मोठी जमवाजमव करण्यात आली. १९७१च्या युद्धानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात (जवळपास पाच लाख सैनिक आणि तीन चिलखती डिव्हिजन्स) पाकिस्तानी सीमेजवळ सैन्य खडे करण्याची ती पहिलीच वेळ. त्या मोहिमेस ‘ऑपरेशन पराक्रम’ असे नाव देण्यात आले. वरकरणी युद्धसराव, प्रत्यक्षात युद्धमोहीमच. जनरल पद्मानाभन यांच्यावर लष्करप्रमुख म्हणून कमीत कमी वेळेत सैन्य आणि सामग्री जुळणीची जबाबदारी होती. ‘ऑपरेशन पराक्रम’ मोहीम यशस्वी ठरली नाही. परंतु त्या अपयशाचे खापर जनरल पद्मानाभन यांच्यावर फोडले जात नाही, हे उल्लेखनीय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा