लालनशाह फकीर हे मुघल साम्राज्याचा अस्त आणि ब्रिटिश वसाहतवादाचा उदयकाळ पाहणारे बंगाली संतकवी. ‘त्यांच्या कवितांनी रवीन्द्रनाथ टागोर, काझी नझरुल इस्लाम तसेच अमेरिकन कवी अॅलन गिन्सबर्ग यांना प्रेरणा दिली’ हे तर विकिपीडियाही सांगतो. पण भारताचे माजी परराष्ट्र सचिव मुचकुंद दुबे यांनी या लालनशाहच्या गीतांचा सुगम हिंदी गीतानुवाद केला होता… तो २०१७ मध्ये प्रकाशित तरी झाला; पण १९५३ साली- म्हणजे २० वर्षांचे असताना मुचकुंद दुबेंनी रवीन्द्रनाथांच्या ‘गीतांजली’तल्या अनेक कवितांचा अनुवाद केला, बांगलादेशी कवी शम्सउर्रहमान यांचीही गीते हिंदीत आणली, ती आजही त्या वेळच्या कुठकुठल्या हिंदी ‘साहित्य पत्रिकां’मध्ये विखुरलेली आहेत. जगण्याची उच्च ध्येये आध्यात्मिक बाजाच्या कवितेतून आकळून घेणारे मुचकुंद दुबे ऐन शीतयुद्धाच्या काळात ‘भारत कुणाही एका बाजूकडे झुकणार नाही’ ही तत्त्वाग्रही भूमिका संयुक्त राष्ट्रांत भारताचे दूत म्हणून मांडत राहिले होते. त्यानंतरचे उणेपुरे दीड वर्षभर (एप्रिल १९९० ते नोव्हेंबर १९९१) परराष्ट्र सचिवपदीही होते. त्यांच्या ज्ञानी व्यक्तित्वाची छाप अनेकांवर पडली होती, हे २६ जून रोजी त्यांच्या निधनानंतर आदरांजलीच्या ओघातून दिसले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा