स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात १९४८ ते साधारणपणे १९८५ पर्यंतचा काळ हा मराठी नियतकालिकांचा सुवर्णकाळ होता. घरोघरी वर्तमानपत्रांच्या बरोबरीने साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके, अर्धवार्षिक, वार्षिक, दिवाळी अंक वाचणाऱ्यांचा मोठा वर्ग होता. दिवाळी अंक महाराष्ट्राच्या संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण. ते इतर प्रांत नि भाषांमध्ये अपवादाने दिसून येत असे. दिवाळी अंकाचे हे वैशिष्ट्य होते. संपादक ललित साहित्याइतकेच महत्त्व वैचारिक साहित्यास देत असत. कथा, कविता, कादंबरीइतकेच वैचारिक लेख, मुलाखती, परिसंवादांचे महत्त्व होते. १९५९च्या ‘मौज’ दिवाळी अंकाने ‘उद्याचा महाराष्ट्र’ विषयावर परिसंवाद योजला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापनेचे आंदोलन टिपेला पोहोचले होते. या लिखित परिसंवादात सर्वश्री एस. एम. जोशी, कॉम्रेड एस. ए. डांगे, स्वामी रामानंद तीर्थ, ना. ग. गोरे, बी. सी. कांबळे, शंकरराव मोरे, पु. ह. पटवर्धन, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. दत्तो वामन पोतदार, कुलगुरू र. पु. परांजपे यांनी भाग घेतला होता. ते विविध पक्ष व समाजवर्गाचे प्रतिनिधी होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा