अविघटनशील प्लास्टिकचा सर्वात जास्त वापर करणाऱ्या जगातल्या पहिल्या पाच देशांत भारताचा क्रमांक लागतो. गेली अनेक वर्षे प्लास्टिकवर पूर्णत: बंदी घालण्याचे प्रयत्न आपल्या देशात सातत्याने झाले. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी पूर्णाशाने झाली नाही, ही वस्तुस्थिती असली, तरी महाराष्ट्र सरकारने पर्यावरणाला हानीकारक असलेल्या प्लास्टिकवरील बंदी अंशत: का होईना उठवण्याचा घेतलेला निर्णय धोक्याच्या इशारा पातळीपलीकडे नेणारा आहे. सर्वात कमी म्हणजे तीन टक्के कचरा निर्माण करणारे मध्य प्रदेश हे राज्य आहे. ज्या राज्यात सर्वाधिक शहरी वस्ती आहे, तेथे प्लास्टिकचा कचरा अधिक प्रमाणात निर्माण होतो, असे निरीक्षण आहे. या आकडेवारीवरून त्याला दुजोराच मिळतो. महाराष्ट्र सरकारने प्लास्टिकबंदी लागू केल्यानंतर ज्याच्या हाती प्लास्टिकची पिशवी, त्या व्यक्तीवर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यास नागरिकांकडून मोठा विरोध झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा