विसाव्या शतकातील सहाव्या दशकात मराठी नियतकालिकांमध्ये शब्दकोड्यांचे पेव फुटले होते. त्यात ‘लोकसत्ता’मधील शब्दकोडी प्रसिद्ध होती. ती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर व नाटककार विद्याधर गोखले आलटून-पालटून तयार करीत. पुढे साळगावकरांनी महाराष्ट्रात ‘शब्दरंजन’ शब्दकोडे स्पर्धा रुजविली. तिला यश आल्यानंतर ‘शब्दरंजन’ दिवाळी अंक सुरू केला. त्याचे संपादक होते ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ ग. दि. माडगूळकर. त्यांनी १९६२ च्या आपल्या दिवाळी अंकात ‘महाराष्ट्राची नीतिमत्ता’ विषयावर परिसंवाद योजला होता. त्यात नीतिमत्ता विषयाच्या विविध पैलूंवर विद्वानांनी प्रकाशझोत टाकला होता. डॉ. गो. स. घुर्ये, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर, प्रा. गोवर्धन पारीख, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. सुमंत मुरंजन, वि. पु. भागवत यांनी नीतिमत्तेवर लिहिले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा