या निवडणुकीच्या तीन नायकांतील मुख्य चेहरा कोणाचा असेल तर तो नि:संशय देवेंद्र फडणवीस यांचा. भाजपची गेल्या १० वर्षातील वाटचाल हा फडणवीस यांच्या नेतृत्वाचा आणि त्यातील आव्हानांचा प्रवास आहे…याची सुरुवात २०१४ साली झाली. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निर्विवाद यश मिळवले आणि अर्थातच त्याचे फळ म्हणून त्यांच्या हाती सत्तासूत्रे दिली गेली. त्यांचा पाच वर्षांचा कारभार हा महाराष्ट्राच्या स्थैर्याचा काळ होता. नंतर २०१९ साली त्यांना स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही आणि त्यावेळी एकत्रित शिवसेनेने आणि त्याहीपेक्षा त्या एकत्रित शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना सत्तासहभागासाठी राजी करण्यात भाजपच्या दिल्ली नेतृत्वाने दाखवलेली अनाकलनीय उदासीनता त्यांना भोवली. तो फडणवीस यांच्या परीक्षा-काळाचा प्रारंभ. पुढे शिवसेनेते फूट घडवून आणि एकनाथ शिंदे यांस हाताशी धरून फडणवीस यांनी सत्ताकारण केले खरे. पण त्यांच्या प्रतिमेस तडा गेला. तोही विरोधकांकडून नव्हे तर स्वपक्षीयांकडून. आपल्याच दिल्लीश्वरांनी लादलेली दुय्यम भूमिका फडणवीस यांनी गोड मानून घेतली. याच काळात मराठा आंदोलन पेटले आणि फडणवीस यांच्या शिरावर खलनायकत्वाचा मुकुट चढवला गेला. मनोज जरांगे या तोपर्यंत फारशा ज्ञात नसलेल्या कार्यकर्त्यावर पोलिसांचा लाठीमार झाला आणि त्याचे बालंट गृहखाते सांभाळणाऱ्या फडणवीस यांच्यावर आले. तेथून पुढे फडणवीस स्वपक्षीय आणि अन्यांस नकोसे झाले. याच वातावरणात झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपस फटका बसल्यावर तर फडणवीस यांच्या पापाचा घडा भरला असेच विरोधकांस वाटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा