मानवेंद्रनाथ रॉय यांच्या जीवनप्रवासाचा प्रारंभ क्रांतिकारी उठावाच्या ऊर्मीतून झाला. अनेक देशांमध्ये कम्युनिस्ट क्रांती करून ते १९३० ला भारतात परतले. इतक्या देशांतील क्रांतीच्या अनुभवांनी ते संतुष्ट नव्हते. मुळात भारतात तरुणपणी (१९१५) जी क्रांती करण्याचे स्वप्न होते, ते पूर्ण करण्याचा त्यांचा इरादा होता. इथे येताच त्यांना तुरुंगवास घडला. १९३६ ला तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या झेंड्याखाली लोकसमित्यांद्वारे स्वराज्य मिळविण्याची योजना ठेवली. ती स्वीकृत न झाल्याने त्यांना काँग्रेसमधून बाहेर पडून ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’ स्थापन करावी लागली. या पक्षाचीही भारतात डाळ न शिजल्याने त्यांना पक्ष बरखास्त करून वैचारिक चळवळीची कास धरावी लागली. पक्ष बरखास्तीचे जे अधिवेशन २६ ते ३० डिसेंबर, १९४८ या काळात कलकत्त्यात संपन्न झाले, त्याचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. २६ डिसेंबरच्या आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी नवमानवतावाद मांडून त्याची अनिवार्यता स्पष्ट केली. ३० डिसेंबर रोजी अधिवेशनाच्या समारोपाला केलेले भाषण ‘पक्ष ते वैचारिक चळवळ’ अशा प्रवासाचे सिंहावलोकन होते. त्यात तर्कतीर्थ हे मान्य करतात की, ‘‘ The diffusion of power is not possible through its capture but through rousing the will to power in innumerable individuals. The will to know and to live a more cultured life must also be toused. It is a mark of egoism to refuse to recognise that the growth knowledge and culture takes place a good deal outside the rank of political party.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा