मिलिंद रेगे हे मुंबई क्रिकेटमधील अस्सल रोमँटिक व्यक्तिमत्त्व. मुंबई क्रिकेटचा माहितीकोश ही त्यांची आणखी एक ओळख. १९६०, ७० आणि ८० च्या दशकात मुंबई क्रिकेटचा दबदबा, दरारा कसा निर्माण झाला नि टिकून राहिला हे जाणून घेण्यासाठी रेगे यांच्या संगतीतला अर्धा तासही पुरेसा ठरे आणि तो अनुभव खरोखर समृद्ध करणाराच असे. मुंबई क्रिकेटमधील रथी, अतिरथी आणि महारथींच्या वर्तुळात मिलिंद रेगे केवळ वावरले असे नव्हे, तर स्वत:ची स्वतंत्र ओळखही त्यांनी निर्माण केली. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यापेक्षाही मुंबई क्रिकेट संघात स्थान मिळवणे नि ते टिकवणे अधिक खडतर होते. ती कामगिरी करून दाखवल्याचे, आणि पुढे तर मुंबई संघाचे नेतृत्व केल्याचे रास्त समाधान आणि अभिमान रेगे यांच्या वर्तनातून आणि वक्तव्यातून नेहमी प्रकट होई. रूढार्थाने ते रणजी क्रिकेट स्तराच्या वर गेले नाहीत. ५२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २९.२३ च्या सरासरीने १२६ बळी आणि २३.५६ च्या सरासरीने १५३२ धावा ही कामगिरी तशी माफकच. पण ते १९६६-६७ ते १९७७-७८ या काळात खेळले, त्या अनुभवाच्या शिदोरीचे आणि शहाणिवेचे मोल धावा, बळी नि सरासरी अशा ठोकळेबाज आकडेवारीपेक्षा कितीतरी अधिक होते. यासाठी प्रथम त्या काळाचा धांडोळा घ्यावाच लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा