रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वर्तनात दिसणारी मग्रुरी कायम आहे, हेच मुंबईतही पुन्हा दिसले. वरळी भागात रविवारी पहाटे भरधाव आलिशान मोटारीने दुचाकीवरील दाम्पत्याला उडवल्याच्या घटनेने पुन्हा एकदा बेदरकारपणे वाहन चालविण्याचा मुद्दा ऐरणीवर आणला. पुण्याच्या कल्याणीनगरात भरधाव आलिशान मोटारीने दोन संगणक अभियंत्यांचा जीव घेतला, त्याला जेमतेम दीड महिना झाला. त्यानंतर जवळपास तसाच प्रकार मुंबईत होऊन त्यात एका सामान्य व्यक्तीचा हकनाक बळी जातो, याचा अर्थ आणखी काय काढणार? विजयोत्सवासाठी रस्ते अडवून केल्या जाणाऱ्या उन्मादापासून बिनधास्त सिग्नल तोडण्यापर्यंत आणि ‘नो एंट्री’तून वाहने दामटण्यापासून नियम पाळणाऱ्यांवरच अरेरावी करण्यापर्यंत सगळे अगदी आहे तसेच सुरू आहे! आधीच्या घटनांतून कोणीही काहीच धडा घेत नाही. नव्हे, घेणारच नाही, अशी ही अत्यंत निर्लज्ज वृत्ती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा