संसदेच्या स्थायी समितीचा देशभरातील मेट्रोसंदर्भातील अहवाल राज्यकर्त्यांनी अकारण फुगवलेल्या विकासाच्या फुग्याला टाचणी लावणारा आहे. चकचकीत मेट्रो हेच जणू विकासाचे मूर्तिमंत प्रतीक असा बागुलबुवा अलीकडच्या काही वर्षांत सरकारांकडून उभा करण्यात आला. वाहतूककोंडीवर मेट्रो हाच एकमेव व अंतिम उपाय असेही चित्र रंगवण्यात आले. ते किती फसवे निघाले हे या अहवालात पानोपानी दिसून येते. योग्य नियोजन न करता केवळ कंत्राटदारधार्जिण्या धोरणाला प्राधान्य दिले की काय होते हेच हा अहवाल सांगतो. देशातील एकाही शहरातील मेट्रोसेवा आर्थिकदृष्टय़ा फायद्यात नाही. दिल्लीचा अपवाद वगळला तर इतर ठिकाणी मेट्रो अपेक्षित प्रवासीसंख्या गाठू शकली नाही. याला धोरणाचे अपयश नाही तर आणखी काय म्हणायचे?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा