‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून बनवलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनास यंदा मुंबईत काही ठिकाणी पोलीस आणि महापालिकेने गणेश मंडळांना प्रतिबंध केला. यातून उद्भवलेला वाद लवकर शमण्याची चिन्हे नाहीत. तरीदेखील परवा मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेने न्यायालयीन आदेशाचा आब राखत कर्तव्यपालन केले याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. अशा प्रकारे अटकाव या संस्थांकडून प्रथमच करण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या दोन्ही संस्थांनी केंद्रीय पर्यावरण नियंत्रण मंडळ, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय अशा शीर्षस्थ प्राधिकरणांच्या आदेशांचेच पालन केले. त्याबद्दल त्यांना रोष ओढवून घ्यावा लागला हे प्राप्त परिप्रेक्ष्यात तसे अपेक्षितच. पण संधी असूनही जनक्षोभ वा धार्मिक भावनांकडे बोट दाखवत पळवाट काढली नाही हे महत्त्वाचे. भाद्रपदातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह देशाला सुपरिचित. गेल्या काही वर्षांमध्ये माघी गणेशोत्सवालाही महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. हा अर्थातच ज्याच्या-त्याच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग. मात्र कोणताही सार्वजनिक उत्सव किंवा सार्वजनिक कार्यक्रम नियम व शिस्तीच्या चौकटीत पार पडणे ही अपेक्षा अनाठायी नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा