राजेश बोबडे

मजूर, मालक व मुनिमांच्या अधिकारांच्या दुरुपयोगातून एकमेकांच्या शोषणाची मनोवृत्ती कशी तयार होते व राष्ट्राचा विनाश कसा होतो याचे विवेचन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘मालक म्हणतो, ‘मी न सांगता नोकराने आयते काम करून द्यावे;’ नोकर म्हणतो, ‘मी घरी बसलो असलो, तरी मजुरांनी बरोबर काम करावे’ आणि मजूर म्हणतो, ‘या ऐतखाऊ लोकांचे काम मन लावून करण्याची मला काय गरज? यांचा पैसा हरामाचा आहे; नियत फुकटात चैन भोगण्याची आहे.’ राष्ट्राची शेती सांभाळणाऱ्या मोठमोठय़ा लोकांतदेखील असेच त्रांगडे झाले आहे. मोठमोठय़ा कारभाऱ्यांना व अधिकाऱ्यांना पैसा, चैन आणि आपले जीवन इतके प्यारे झाले आहे की त्यापुढे त्यांना नेमून दिलेले काम शत्रू वाटू लागले आहे. स्वत: न झटता व दुसऱ्याला न शिकविता पैसे उधळून कुणाकडून तरी काम करून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे राष्ट्राचे जीवन ‘बारभाईकी खेती आणि तिनका न लागे हाती’ असे होत जाणे साहजिकच आहे.

Bhushan Gagranis order to the officials to make no mistakes in the work of the upcoming assembly elections
आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामात कसूर नको, भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
Live in relationship
“लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सज्ञान जोडप्यांना संरक्षण दिलं पाहिजे, मग ते विवाहित असले तरीही”, उच्च न्यायालयाचे निरीक्षण
children, studies, loksatta news,
सांदीत सापडलेले…! : मदत?
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
Bajaj Finance officials beaten up by borrowers in Kanchengaon in Dombivli
डोंबिवलीतील कांचनगावमध्ये बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांना कर्जदारांकडून मारहाण

एकीकडे सक्तीने उपाशीपोटी काम करूनही लोकांना दोन पैसे मिळू नयेत आणि दुसरीकडे केवळ बेजबाबदारपणे हेळसांड केल्यामुळे लाखो रुपये चुकणाऱ्या योजनांवर बरबाद केले जावेत, अशा अव्यवस्थितपणाचे लोण वरून खाली येत-येत ते सर्वाच्या अंगी भिनले तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न करून महाराज म्हणतात सत्यशोधनाच्या दृष्टीने याबाबत मजुरांना जेव्हा त्यांच्या चुकारपणाचा जबाब विचारावा, तेव्हा ते म्हणतात – ‘दिवाणजीच आम्हाला बरोबर समजावून देत नाहीत’ व दिवाणजी म्हणतो – ‘मला त्याची कल्पना मालकांनीच दिलेली नाही.’ आपल्या मर्जीतले लोक सोडून बाकी प्रत्येकाच्याच ‘रिपोर्टवर’ खालपासून वपर्यंत वाईट शेरे दिसून येतात आणि प्रवृत्ति पाहावी तर प्रत्येकाचीच दुसऱ्याला दोष देऊन मोकळे होण्याची असते. चूक दुरुस्त करून व स्वत: समजावून देऊन काळजीने काम करवून घ्यावे व मग त्यावर आपले विचार लिहावेत, ही प्रथा बहुधा कोठेच आढळत नाही.

कसे तरी आपले लोक भराभर योजावेत, त्यांना चैन करता येईल व चरता येईल अशी कामे द्यावी आणि सर्वानी मिळून आपला ‘लुबाडू गट’ मजबूत करून ठेवावा, हा जणू आजकालचा धर्म झाला आहे! अर्थात् यामुळे भयंकर घोटाळे माजून राष्ट्राचा नाश होणार हे उघड आहे. पण अशा गटबाजी वाढविणाऱ्या स्वार्थशूर मुनिमांना लोकांनी तरी का नेमावे, का निवडावे आणि मग कुरकुरत का बसावे? आपल्या अधिकारांचा योग्य उपयोग करून योग्य लोकांनाच का नेमू नये? आणि कुणालाही नेमले तरी त्याचेकडून योग्य काम जागरूकपणे का करून घेऊ नये? तसे जर झाले तर मग मालकावर भिकारी होण्याची पाळी तरी कशाला येईल? आपण जर न्यायनीतीने व कर्तव्यदक्षतेने आपली मालकी चालवू तर दिवाणजींना घोटाळा करता येणार नाही; नोकरात गटबाजी व खाऊपणा वाढणार नाही आणि गरीब मजुरांवर अन्याय होणार नाहीत. प्रत्येकजण अशा रीतीने जर आपापल्या कामात दक्ष राहिला तर सारे राष्ट्र आनंदाने नांदू लागेल.

rajesh772@gmail.com