‘दोन ध्रुवांवर दोघे’ (१७ सप्टेंबर) हा अग्रलेख वाचला. करवाटपाच्या बाबतीत दक्षिणेकडील राज्यांनी केलेली मागणी रास्तच! कारण केंद्राकडून राज्यांना दिला जाणारा कराचा वाटा हा लोकसंख्येवर आधारित असतो. १९७६मध्ये करणसिंग यांच्या अध्यक्षतेखाली लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आले. २००० साली ते अद्ययावत करत दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आखले गेले. त्यानुसार दक्षिणेकडील राज्यांनी प्रगती केली. तर उत्तरेकडील राज्यांनी प्रगती केलीच नाही असे नाही, मात्र तेथील लोकसंख्या वेगाने वाढत गेली. त्या राज्यांत लोकसंख्या नियंत्रण, लिंग गुणोत्तरात सुधारणा, परिणामकारक कुटुंबनियोजन व्यवस्था यासंदर्भात जनजागृती करण्यात तेथील व्यवस्था नक्कीच कुठेतरी कमी पडलेली आहे. तेराव्या, चौदाव्या वित्त आयोगापासून दाक्षिणात्य राज्यांची करांविषयी वाढती मागणी पाहता, तेथील प्रगतीच्या मानाने ही मागणी रास्तच ठरते. अन्यथा सुधारणा कराव्यात एकाने आणि लाभ घ्यावा इतरांनी, असाच प्रकार आहे. – रंजीत नागीण गोविंद तिगलपल्ले, लातूर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा