‘तात्यांचा ठोकळा’ हा ‘अन्यथा’ सदरातील गिरीश कुबेर यांचा लेख (१९ ऑक्टोबर) वाचून अस्वस्थता आली. परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परिस्थिती बिकट आहे यात वाद नाही पण त्याबरोबरच ही मुले डोळे उघडे ठेवून आजूबाजूला काही पाहतात की नाही असेही वाटते. ‘लोकसत्ता’मध्ये डॉक्टर श्रीराम गीत जे मार्गदर्शन करतात, त्यात सतत स्पर्धा परीक्षांचा विचार कसा करावा याबद्दल लिहिलेले असते. दुसरा मुद्दा असा की आजही असे अनेक लोक आहेत, जे एक किंवा दोन मुलांचा जेवणाचा खर्च आनंदाने उचलू शकतात. पण अडचण आहे ती अशांना एकत्र आणण्याची. ज्येष्ठ नागरिकांना अशा पद्धतीने मदत देण्याची इच्छा असते. अशा व्यक्तिगत संबंधांमुळे दोन्ही बाजूंनाही मानसिक आधार आणि आनंद मिळू शकतो पण प्रश्न आहे विश्वासार्हतेचा. राष्ट्र सेवा दल किंवा तत्सम संस्था यासंदर्भात दुव्याचे काम करू शकतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा